🕒 1 min read
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. इंग्रजांनी धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडून भरपूर लूट केली. आता भाजपही धर्माच्या नावावर लोकांना विभाजित करुन देशाची प्रचंड लूट करत आहे. महागाई आणि बेरोजगारीचे काय? असा सवाल नाना पटोले यांनी ट्वीट करत केला आहे.
तसेच ‘मोदी सरकारकडून इंधन दरवाढीतून गोरगरीबांची लूट सुरुच! आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह दोन आठवड्यात इंधनात ९.२० रुपयांची दरवाढ. पाकिटमार भाजपा सरकार’, असे पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी ‘रशियाकडून बाजारदरापेक्षा ३५ डॉलरच्या डिस्काऊंटने स्वस्त पेट्रोल डिझेल खरेदी करायचे आणि देशवासियांना आठ रुपये महागाने विकायचे! व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार’, असे म्हणत नाना पटोलेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. एकेकाळी इंग्रजांनी भारताला लुटले आता भाजप धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडून लुट करत असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“समृद्धी महामार्ग ही माझीच संकल्पना, काहीही केलं तरी…”, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
“त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही”, राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
पाकिस्तानचे रमीझ राजा म्हणजे ‘पलटी-मास्टरच’..! आता म्हणतात, “IPLबाबतचं ते वक्तव्य…”
IPL 2022 LSG vs SRH : हैदराबादचा भुवनेश्ववर कुमार बनला सुपरमॅन, पण….; पाहा नेमके काय घडले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
