कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते डझनभर केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराचं रान उठवून दिलं होतं.
पण या रणधुमाळीत काँग्रेसचा आवाज मात्र क्षीण दिसत होता. पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसच्या या खेळीमागे भाजपला रोखणं आणि ममता बॅनर्जींना फायदा पोहोचवणं हाच हेतू असल्याचं बोललं जात आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या २७ मार्चला होत असून उद्या एकूण ५ जिल्ह्यांमधील ३० मतदारसंघांसाठी मतदान होईल. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुरुलिया, बांकुरा, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होईल. या मतदार संघात एकूण २२,६४,७३४ मतदार आहेत. त्यापैकी ११,५७,६१८ पुरुष आणि ११,१६,१०३ महिला मतदार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये मागील १० वर्षांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे आणि यावेळी ममता बॅनर्जी हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहेत. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये एकाच वेळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आणि भाजपप्रणित या दोन आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
कोणत्याही परिस्थितीत बंगाल भाजपच्या हाती जाऊ नये म्हणून गांधी कुटुंबाने प्रचारात भाग घेतला नाही. प्रचारात भाग न घेता ममता बॅनर्जींना काँग्रेसने मोकळं रान करून दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांना जो मेसेज जायचा तो गेला असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या या अनपेक्षित खेळीमुळे भाजपची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. तिरंगी लढत झाली असती तर काँग्रेस आणि टीएमसीच्या मतांमध्ये विभागणी झाली असती. त्याचा फायदा भाजपलाच झाला असता, असं भाजपला वाटत होतं. पण काँग्रेसच्या खेळीने भाजपला टेन्शन दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी संघटनांकडून आज भारत बंद करण्यात आला असताना मोदी मात्र विदेशी गेले आहेत’
- चारशे वर्षांच्या इतिहासावर कोरोनामुळे गदा! २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार नाथ सोहळा
- ऋषभ पंत ४३६ दिवसांनी वनडे खेळला अन् इंग्रजांना पळता भुई थोडी…
- मांजरा धरणाचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी गेले वाया
- खुप गरजेचे काम असेल तरच बाहेर पडावे, पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

