Share

बोललो तर बोललो : प्रशांत किशोर यांचे ‘ते’ भाकीत ठरणार खरे !

Published On: 

कोलकता : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.

सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. ते सध्या ५ जागांवर आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दुसऱ्या मतमोजणी अखेर ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. भाजपचे शुभेन्दु अधिकारी आघाडीवर आहेत.

अशात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करत बंगालमध्ये भाजपने तीन आकडी संख्या ओलांडली तरी आपण आपले निवडणूक स्ट्रटेजीचे काम सोडून देऊ असे आव्हान दिले होते. तसेच दोन मे निकालाच्या दिवसापर्यंत माझे हे ट्विट जपून ठेवा, असेही ठामपणे सांगितले होते. त्यांचे म्हणणे खरे ठरते की काय, अशी स्थिती आता भाजपवर येत आहे.

प्रचंड ताकदीने भाजप या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे तेथील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी येथे प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. पण निकाला भाजपच्या मनासारखे अजिबात दिसत नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!