Share

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज 1.54 कोटीहून जास्त मतदार बजावणार आपला हक्क

Published On: 

कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या नंतर आज पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यावेळी पहिल्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते डझनभर केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराचं रान उठवून दिलं होतं.

पण या रणधुमाळीत काँग्रेसचा आवाज मात्र क्षीण दिसत होता. पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसच्या या खेळीमागे भाजपला रोखणं आणि ममता बॅनर्जींना फायदा पोहोचवणं हाच हेतू असल्याचं बोललं जात आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान आज २७ मार्चला होत असून एकू्ण 77 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांचा विचार करता शनिवारी एकूण 1.54 कोटीहून जास्त मतदार आपला हक्क बजावतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने या भागात मोठ्या प्रमाणात म्हणजे सुरक्षा दलांच्या जवळपास 684 कंपन्या तैनात केल्या आहेत. यामध्ये एकूण 10,288 मतदान केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. या व्यतिरिक्त महत्वाच्या ठिकाणी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आज पश्चिम बंगाल आणि आसाम मधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!