जालना : शनिवार (दि. 27) च्या संध्याकाळपर्यंत तरी लॉक डाऊन नाही. त्यानंतर पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. रविंद्र बिनवडे सर यांनी नुकतीच दिली आहे. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागासह पोलिस प्रशासन देखील खुप प्रयत्न करत असल्याचे मत या वेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
जालन्यासह संपुर्ण मराठवाड्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. तर परभणी, हिंगोली, बीड येथे लॉकडाऊनची घोषणा करुन कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी पोलिस, महानगर पालिका, आरोग्य विभाग खुप युद्ध पातळीवर काम करत आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद येथे देखील रात्रीची संचारबंदी घातली आहे. परंतू आता मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी करावयाची असल्यास लॉकडाऊनचा पर्याय असणार असल्याचे मत देखील व्यक्त केले होते.
आता महाराष्ट्रामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्हामध्ये वाहनांना जिल्हाबंदीचे आदेश दिलेले आहेत. तर कोणतेही वाहन विनापरवाना तसेच अत्यावश्यक सेवा वाहन असल्याशिवाय जावू दिले जात नाही. त्यामुळे आता कोरानाचा रुग्णांचा आकडा जर आटोक्यात आला नाही, तर पुन्हा लॉकडाऊन लागू शकते अशीही परिस्थिती निर्माण होवू शकते. परंतू शनिवारी सायंकाळपर्यंत लॉकडाऊन लागणारे नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच राहतील, बाहेरच्यांनी…काँग्रेसचा राऊतांना टोला
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

