🕒 1 min read
मुंबई : एल्गार परिषदेतील आपल्या भाषणात शरजील उस्मानी याने ‘हिंदू समाज सडका झालाय’ अशा प्रकारच वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. शरजिल उस्मानी याने भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केल होत.
यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? या राज्यात काय मोघलाईचं सरकार आहे का ? शरम वाटायला हवी या सरकारला. आता चौकशी करू म्हणतायत, सगळीकडे त्याचे व्हिडीओ आहेत, चौकशी कसली करताय ?’ असा संतप्त सवाल देखील फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करुन वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय’ असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, आजच्या सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणविसांना खोचक आश्वासन देत ‘शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केली !’ अस म्हणत महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेडय़ा पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. असे आश्वासन देण्यात आले आहे.
महत्वच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- धक्कादायक! एचआयव्हीबाधीत ५ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले; मुख्याध्यापकाकडून आरोपाचे खंडण
- शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणाला…
- शेतकरी आंदोलनावर सचिन-विराट, रोहितनंतर अनेक क्रिकेटपटूंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- शहरातील रस्त्यावरुन उच्च न्यायालयाने मनपाला ठणकावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
