मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकार चांगलेच तोंडावर पडले आणि याचा फायदा घेत भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. आता या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती व्हावी म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्य सरकारने विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी नितीन बानगुडे (Nitin Bangude) यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र दोन वर्ष झाले तरी नियुक्ती होत नसल्याने आता बानगुडे कोर्टात दाद मागणार आहेत. कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून ते कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, राज्य सरकारने विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी नितीन बानगुडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. मात्र दोन वर्ष झाले तरी नियुक्ती होत नसल्याने आता बानगुडे कोर्टात दाद मागणार आहेत. तसेच या संदर्भात कोर्टात पिटीशन दाखल करता येते का, याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. तसेच कायदे तज्ज्ञांशी मी वैयक्तिक चर्चा करणार आहे. त्याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या:
भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याने कार्यकर्त्यांची संपत्ती जास्त असणारच-प्रविण दरेकर
कोरोनाच्या लाटेबद्दल राजेश टोपे म्हणाले, राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक…
“जनाब संजय राऊत झिंग झिंग झिंगाट झाले आहेत”, गोपीचंद पडळकरांची टीका
खा. सुप्रिया सुळेंचे श्री संत तुकाराम महाराजांना साकडे, संस्थान अध्यक्षांशी केली चर्चा
राज्यात निर्बंध शिथील बाबत आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

