🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगारांसाठी विशेष तरतूद केली आहे. धनगड व धनगर हे एकच आहेत, त्यामुळे या समाजाचा आदिवासींमध्ये समावेश आहे. तो हक्क आम्हांला द्या तरच तुमचं राज्य टिकेल, असा निर्वाणीचा इशारा आमदार रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेत सरकारला दिला आहे.
दरम्यान , धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता मात्र भाजप सरकारने आरक्षणाच आश्वसन पूर्ण न केल्याने धनगर समाज सरकारवर कमालीचा नाराज असल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. याचाच प्रश्न निर्माण करत आमदार रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेत सरकारला चांगलंच धारेवर धरल आहे.
धनगर समाजाची ज्यांनी फसवणूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे- अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
