औरंगाबाद : आम्ही या पेक्षा जास्त लॉकडाऊनचे अनुसरण करू शकत नसल्याचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. खासदार जलील यांनी या आधी देखील कडक लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊन शिवाय कोणताही दुसरा पर्याय नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. हे वृत्त येताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही पोस्ट केली आहे. औरंगाबाद शहरातील अनेक नागरिक लॉकडाऊनमुळे त्रस्त आहेत. त्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न आधी मार्गी लावा आणि नंतरच लॉकडाऊन करा अशी भूमिका खासदारांनी या आधीही घेतली होती. राज्यात लॉकडाऊन लावण्याआधी औरंगाबाद प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनलाही त्यांनी विरोध केला होता. त्याच वेळी त्यांनी मोर्चा काढण्याची तयारी देखील केली होती.
We will not follow ay more lockdowns! Enough is enough.!
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) April 10, 2021
मात्र, सर्वच लोकप्रतिनिधी दबाव टाकत असल्याने आधी औरंगाबाद जिल्ह्यात लावण्यात आलेले लॉकडाऊन उठवण्यात आले होते. त्यामुळे खासदार जलील यांनी मोर्चाही रद्द केला होता. मात्र, आता राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुढे लॉकडाऊन आम्ही पाळू शकत नसल्याचे खासदारांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लस घेऊ, संसर्ग रोखू’ उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे- खा. भागवत कराड
- ठेवुया एक मीटर अंतर, करूया कोरोना छू मंतर! माजी सैनिकाची अनोखी जनजागृती
- ‘गर्दी करून प्रचार सभा घ्यायच्या आणि महाराष्ट्राला घरात बसायचे धडे द्यायचे’
- …मग कोरोना लस मोदीजींच्या घरात तयार होते का?
- ‘या’ वॉर्डात मिळतोय लसीकरणाला कमी प्रतिसाद, त्यामुळे केंद्रे इतरत्र हलवणार!


