🕒 1 min read
नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांवरुन शेतकरी संघटना आणि सरकारमधील वाद अद्याप कायम आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आंदोलक शेतकऱ्यांचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत सरकारने गुरुवारी चर्चेसाठी नवीन निमंत्रण पाठविले.
नवे कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीबाबत लेखी हमी हेच सरकारसोबतच्या चर्चेचे प्रमुख मुद्दे असतील असं शेतकरी आंदोलकांच्या संघटनेकडून जाहीर करण्यात आलं आहे. यावर आता केंद्र सरकारनेही शेतकरी संघटनांना लेखी उत्तर दिलं आहे.शेतकरी संघटनांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व मुद्द्यांवर बोलण्याची आणि त्यावर समाधानकारण तोडगा काढण्याची केंद्र सरकारची तयारी आहे असं उत्तर केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना दिलं आहे.
शेतकरी संघटनांनी वेळ आणि तारीख निश्चित करावी यासोबतच पत्रात नमूद केलेल्या विषयांव्यतिरिक्त आणखी काही मुद्दे असतील तर तेही सांगावेत. सरकारची चर्चेसाठी तयारी आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकरी संघटनांना चर्चेसाठीचं आवाहन केलं आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी केंद्र सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत तर्कसंगत चर्चेसाठी सरकार तयार आहे’, असं विवेक अग्रवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.
Many farmers have thanked PM Modi for the new agriculture laws. We will double farmers' income by 2022. The government is ready to talk and clear doubts of the farmers who are protesting. A solution can be found only through dialogue: Union Minister Anurag Thakur pic.twitter.com/kmsVrAxk5J
— ANI (@ANI) December 25, 2020
दरम्यान, एका बाजूला हे सुरु असताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी यांसदर्भात एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ठाकुर यांच्या मते, ‘अनेक शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. आम्ही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. सरकार त्या शेतकऱ्यांच्या शंकांबाबत बातचीत करण्यास तयार आहे, जे या कायद्यांना विरोध करत आहे त्यांच्याशी बातचीत केल्यानंतरच यावर उपाय निघू शकतो’.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष : बाळासाहेब थोरात
- नवीन वर्षात सर्व वाहनांसाठी ‘फास्टॅग’ असेल अनिवार्य
- नाताळचा सण सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो – अजित पवार
- पद्मावत नंतर संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवर्यात…
- कोरेगाव भीमा: जयस्तंभाजवळील गावांमध्ये 30 डिसेंबरपासून 4 दिवस संचारबंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
