मुंबई – भगवान येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केले. वर्षअखेरीस येणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे.
दरम्यान, यंदा सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे कोरोनापासून संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष : बाळासाहेब थोरात
- ‘विदर्भ पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला करुन काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणू’
- भाजप सरकारच्या हुकूमशाहीसमोर काँग्रेस झुकणार नाही, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत राहू : थोरात
- ‘निवडणूका आल्या किंवा ते अडचणीत आले, की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात’
- सरकारची चर्चेसाठी तयारी,वेळ आणि तारीख सांगावी; सरकारचं शेतकऱ्यांना आणखी एक पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

