औरंगाबाद : राम मंदिर निधी संकलनासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करत, इच्छुक उमेदवारांनी तर घरोघरी फिरलेच पाहिजे असा सल्ला आमदार अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजप ओबीसी मोर्चाच्या मंडळ कार्यकारणी नियुक्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
सावे भाषण करण्यासाठी आले असता यांनी सुरुवातीला घोषणा दिली, परंतु उपस्थित कार्यकर्त्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर असाच आवाज असला तर आपण मनपा कशी जिंकू, असा प्रश्न सावे यांनी उपस्थिती केला. हे ऐकताच कार्यकर्त्यांमध्ये त्स्फूर्ती आली. त्यानंतर पुन्हा जोरदार घोषणा झाल्या. त्यावर असा आवाज असेल तरच आपण मनपा जिंकू असे सावे म्हणाले. सावे यांनी त्यानंतर शहराध्यक्ष केनेकर यांचा मुंबई विमानतळावर लागलेल्या बॅनरचा किस्सा सांगत भाषण पूर्ण केले.
या सोहळ्यात खासदार कराड यांना सांगताना सावे म्हणाले की, हा कार्यक्रम माझ्या मतदार संघात आहे. त्यामुळे मला उपस्थित कार्यकर्त्यांची नावे घ्यावी लागेल. या वर चांगलाच हस्यकल्लोळ झाला. त्याबरोबरच सर्व उपस्थित नेत्यांनी देखील सावे यांनी घेतलेल्या नावांना उपस्थित सर्व म्हणत आपल्या भाषणाला प्रारंभ केला.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ‘ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी माझ्याकडे पंतने व्यक्त केली होती इच्छा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
