Share

‘… तसे केले नाही, म्हणून आम्ही जिंकलो नाही’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटची प्रतिक्रिया

Published On: 

दुबई: टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दुबईच्या मैदानावर काल झालेल्या सामन्यात भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.

हे निराशादायक आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर आम्ही धाडसी नव्हतो. आम्ही मैदानात उतरलो तेव्हा आमची देहबोली कमकुवत होती, तर न्यूझीलंड संघाची तीव्रता आणि देहबोली चांगली होती. जेव्हा आम्ही पहिल्या डावात धावा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही संधी साधल्या आणि विकेट गमावल्या. यामुळे आम्ही शॉटसाठी जावे की नाही याबद्दल संकोच करत होतो. भारताकडून खेळताना खूप अपेक्षा असतात. लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारले पाहिजे आणि त्याचा सामना केला पाहिजे. आम्ही या दोन सामन्यांमध्ये तसे केले नाही आणि म्हणूनच आम्ही जिंकलो नाही. अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे.

आम्हाला दबावापासून दूर राहावे लागेल आणि आमची प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल आणि सकारात्मक क्रिकेट खेळावे लागेल. असे तो म्हणाला आहे. दरम्यान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!