औरंगाबाद : दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना व पालकांना बारावी निकालाची उत्सुकता लागली आहे. दहावी अकरावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे हा निकाल तयार केला जात असून त्याचे पंचाहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. औरंगाबाद विभागाअंतर्गत येणार्या जिल्ह्यातील ४२ टक्केच कनिष्ठ महाविद्यालयांनी औरंगाबाद विभागीय मंडळाकडे निकाल पाठवला आहे.
शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार १६ जुलै पासून कनिष्ठ महाविद्यालयाने निकालाचे काम सुरू केले आहे या अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी मंडळाने जुलैपर्यंत मुदत दिली आहे. यात औरंगाबाद विभागातील जालना, परभणी, बीड, औरंगाबाद आणि हिंगोली अशा पाच जिल्ह्यातून एकूण १ लाख ५३ हजार ६७० परीक्षार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. दहा दिवसात एक लाख आठ हजार ८१५ विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांकडून भरण्यात आली आहे.
दरम्यान, गुरूवारी (दि .२२) दुपारपर्यंत फक्त ४२ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांनी मंडळाकडे आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल पाठवला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल घेत आहोत. कनिष्ठ महाविद्यालयांनी लवकर निकाल पाठवावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालये देखील आम्हाला मदत करत आहे. आजपर्यंत ४२ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांनी आमच्याकडे निकाल पाठवल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- कोल्हापुरात आता सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाही ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
- औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या कमी, आता आरोग्य सेवेतील कर्मचारी करणार वसूलीचे काम!
- तळई दुर्घटना; पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत जाहीर
- औरंगाबादेत गॅसदाहिनीचे काम अखेर पूर्ण, मनपा घेणार चाचणी
- ‘मुख्यमंत्री मंत्रालयात… हा दिवस उगवण्यासाठी राज्यात शेकडो बळी जावे लागले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

