Share

श्रीगोंदे तालुक्यासाठी वरदान ठरलेले विसापूर धरण ओव्हर-फ्लो

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेले विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विसापूर धरणाचे विधीवत जलपूजन केले. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे कुकडी धरणातील अतिरिक्त पाणी विसापूर धरणात सोडण्यात आल्यामुळे विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणाखालील गावांना उन्हाळ्यात फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विसापूर धरण्याच्या पाण्यावर या भागातील शेती फुलत आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील कारखाने अवलंबून असतात. विसापूर धरणामुळे या भागातील उसाचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे. दरवर्षी परतीच्या पावसापर्यंत धरण भरण्याची वाट पाहावी लागते. यंदा मात्र धरण लवकरच भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंढरकर, माजी उपसभापती गणपतपतदादा काकडे, बाबासाहेब सरोदे, भाऊसाहेब इथापे, धनंजय शिंदे, जब्बार सय्यद, नितीन नलगे, दत्तात्रय पानसरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!