पुणे : भारत आणि इंग्लड संघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंड संघाचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे.
भारतीय संघाची सुरुवात जरी चांगली झाली असली तरी पूर्ण ५० षटक खेळून काढण्यात संघाला अपयश आलं आहे. भारतीय संघाने इंग्लंडला ३२९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात मात्र धक्क्याने झाली. सलामीवीर जेसन रॉय व जॉन बेयरस्टो स्वस्तात माघारी परतले.
यानंतर, बेन स्टोक्स व डेव्हिड मलान यांनी संघाची स्थिती सावरायचा प्रयत्न केला. मात्र, नटराजनने बेन स्टोक्स ला बाद केले. तर, इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी ही कायम ठेवली होती. त्यामुळे सामना अधिक रंजक बनला. तर, शार्दूल ठाकूरने जोस बटलर, मलान आणि लियाम लिविंगस्टन यांचे निर्णायक बळी घेऊन भारतीय संघाची सामन्यांवरील पकड मजबूत केली आहे.
Thokar khaakar aadmi Thakur banta hai.
All hail Lord Shardul, the game changer#INDvsENG pic.twitter.com/XCyMvsz35f— Virender Sehwag (@virendersehwag) March 28, 2021
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर खुश होऊन भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु वीरेंद्र सेहवाग याने आपल्या खास शैलीत कौतुक केलं आहे. ‘ठोकर खाकर आदमी ठाकूर बनता है ! शार्दूल ठाकूरचा विजय असो, गेम चेंजर’ असं ट्विट विरुने केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जर पुन्हा लॉकडाऊन करायचा असेल तर…; पडळकरांनी दिला सरकारला इशारा
- उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर
- अहमदाबाद येथे अमित शहा-शरद पवार यांची भेट ? राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया…
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- उन्हाचा तडाका वाढतोय, ‘या’ शहरात आज झाली तब्बल ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

