Share

उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवं सरकार यावं – प्रकाश आंबेडकर

Published On: 

पुणे : राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे.

या सर्व प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं असून राज्यात आता नवं सरकार स्थापन व्हावं, अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षात देखील सत्तेत होते. त्यामुळे प्रशासनाबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. पण आता त्यांना कणा नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे. राज्यात नवीन सरकार यावं असं माझं मत आहे,’ असं भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आंबेडकरांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट देखील घेतली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!