मुंबई : कोरोना संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ इंग्ंलंडमध्ये जागतीक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायला सज्ज आहे. बीसीसीआयने या सामन्यासाठी नुकताच संघ जाहिर केला. या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारताला इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
मात्र यादरम्यान जुलै महिन्यात भारताचा कोणताही दौरा नाही. तेव्हा या काळात उर्वरीत आयपीएल स्पर्धा होण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ते शक्य नसल्याचे सांगत या महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असल्याचे सांगितले. श्रीलंकेच्या या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार असल्याची माहिती गांगुलीने दिली आहे.
तथापि, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दौऱ्यात भाग घेणार नाहीत कारण ते यादरम्यान इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त असतील. गांगुली यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही जुलै महिन्यात ज्येष्ठ पुरुष संघासाठी व्हाईट बॉल मालिकेचे नियोजन केले आहे जिथे ते श्रीलंकेत टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय सामने खेळतील.’ गांगुली म्हणाले की, श्रीलंका दौर्यासाठी असलेल्या भारतीय संघात इंग्लंड कसोटी मालिकेसाठी निवडलेला एकही खेळाडू नसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- जागतीक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारत करणार श्रीलंकेचा दौरा
- ‘मुख्यमंत्र्यांचे आवाहन म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, असला किळसवाणा प्रकार’
- आमचा वाली कोण? लातूरमधील इंटर्न डॉक्टरांचा प्रश्न; विविध मागण्यासांठी काम बंद आंदोलन
- आता ‘या’ राज्यातदेखील खासगी रुग्णालयांमध्येही होणार कोरोना रुग्णांवर मोफत उपचार
- नांदेडचा ऑक्सिजन टँकर पळवला; अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन आणि मग…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

