🕒 1 min read
नागपूर: रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद सर्व जगभर उमटत आहेत. त्यात युक्रेनमध्ये एकूण ३० हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी केवळ ९०० विद्यार्थी मायदेशी आणले आहेत. यावरूनच मंत्री विजय वडेट्टीवार (Criticism of Vijay Vadettiwar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“युक्रेनमध्ये ३० हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी फक्त ९०० मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारला नाही, केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.”, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
तसेच युक्रेनमध्ये ४० किमी प्रवास करून गेल्यानंतर थंडीत ते उघड्यावर झोपले. दोन विमाने आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागेल. केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे मात्र ते वाहून जाता कामा नये. असा टोला लगावत केंद्राने प्रत्येक विद्यार्थ्याला परत आणावे. पोलंडचे राजदूत मदत करत नाहीयेत त्यामुळे त्यांना ताकीद देण्याची गरज आहे. तसेच नाटोमध्ये भारताने समर्थन न केल्यामुळे युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही या मुद्द्यावरही लक्ष देणं गरजेचं असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भगतसिंह कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन राजकारण तापले
- Maratha reservation strike : छत्रपती संभाजीराजेंची शुगर लेव्हल व रक्तदाब कमी; डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला
- भारतीय माजी खेळाडू विनोद कांबळीला अपघात प्रकरणात अटक
- “राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
- “आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
