Share

औरंगाबादकरांनो सावधान! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल होतोय गुन्हा

Published On: 

औरंगाबाद : सध्या राज्यात ‘ब्रेक द चेन’ नियमावलीनुसार निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद शहरातही बाजारपेठा बंद आहेत. तसेच विनाकारण फिरण्यास बंदी आहे. मात्र, तरी देखील काही नागरिक रस्त्यांवर फिरत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई करण्यात येत असून अशा १९१ नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद शहरात ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदी पॉईंटवर पोलीस अंमलदार कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची माेहिम देखील पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू आहे.

अशा प्रकारे नियमांचे उल्लघन करणाऱ्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय फिरणाऱ्या १९१ इसमांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये भादंवी कलम १८८, २६९ आणि २७० प्रमाणे ४४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर वाहतूक विभागाच्या वतीने कारणाशिवाय फिरणाऱ्या एकुण १ हजार ७३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून ४ लाख ३७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!