🕒 1 min read
पुणे: शिवसंग्रामचे विनायक मेटे मराठा अरक्षणावर बोलताना म्हणाले, आयोगावर अविश्वास नाही. आयोगाच्या सदस्यावर अविश्वास आहे. पण सरकार याबाबत काहीच हालचाल करत नाही. मविआ सरकारनेच मराठा आरक्षण घालवलं. त्यामुळे ते पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे आता पुन्हा मराठा आरक्षण मिळवायचं असेल तो विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करून सरकार कडे अहवाल सादर करावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केलीय ओबीसी राजकीय आरक्षणाचाही सरकारने घोळ घातलाय, राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिवसंग्राम मराठा आरक्षणासाठी रितसर अर्ज करणार.आणि जर त्यांनी केल नाही तर ठाकरे सरकार आणि आघडी सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर, विधानमंडळामध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
IND vs SL: सुनील गावस्करांकडून बुमराहचे कौतुक म्हणाले “त्याला खेळणे अवघड”
-
“नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू…”; गुलाबराव पाटील आक्रमक!
-
“…तिथे ईव्हीएम काय आणि बॅलेट पेपर काय?”, भातखळकरांचा जितेंद्र आव्हाडांना जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
