🕒 1 min read
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्या ला अवमान प्रकरणी 4 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी विजय मल्ल्याला दोन हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दंड न भरल्यास 2 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असेही त्यात म्हटले आहे. याशिवाय परदेशात हस्तांतरित केलेले 40 दशलक्ष डॉलर्स 4 आठवड्यात भरावेत, असे आदेशही विजय मल्ल्याला देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यामध्ये न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश होता. मल्ल्या यांनी परदेशी खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याबाबत न्यायालयाला केवळ चुकीची माहिती दिली नाही, तर गेल्या 5 वर्षांपासून न्यायालयात गैरहजर राहून न्यायालयाचा अवमान केला आहे. मल्ल्याला 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
सर्वोच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीला सुनावणी पुढे ढकलताना मल्ल्याला आपली बाजू मांडण्याची शेवटची संधी दिली होती. दोषी पुढील सुनावणीत हजर झाला नाही किंवा त्याच्या वकिलामार्फत आपली बाजू मांडली नाही, तर शिक्षेबाबतची कारवाई थांबवली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते.
विजय मल्ल्या काही कायदेशीर युक्त्या अवलंबून युनायटेड किंग्डममध्ये बसला आहे. त्यांनी तेथे काही गुप्त कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूके सरकारने या प्रक्रियेत भारत सरकारला पक्ष बनवलेले नाही किंवा त्याची माहितीही शेअर केली नाही. त्यामुळे मल्ल्याला अद्याप भारतात आणण्यात आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
