मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.
भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यावरून भाजपने महाविकास आघाडी असंवेदनशील असल्याचा आरोप केला होता. विदर्भावर महाविकास आघाडीचा आकस का ? असा सवाल देखील करण्यात आला होता.
भाजपच्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ‘माझं आजोळ विदर्भ आहे, त्याला मी विसरलेलो नाही. त्याला माझ्यापासून तोडू नका. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही,’ असं त्यांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे. गेले अनेक वर्षे विदर्भाला वेगळं राज्य करण्याची मागणी ही विदर्भातील काही संघटनांकडून केली जात आहे. याला भाजपच्या काही नेत्यांचा देखील पाठींबा असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडं, महाराष्ट्राला तोडण्यास विदर्भातील काही जनतेचा देखील विरोध असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून भाजपला ठणकावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राठोडांचा राजीनामा गेला कुठे ? राष्ट्रवादीने दाखवलं CMO कडे बोट !
- ‘तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील’
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विरोधकांचा गोंधळ, एकेरी उल्लेखावरुन देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

