Share

‘तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील’

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोना स्थिती काही दिवसांपूर्वी आटोक्यात आल्या नंतर गर्दीच्या वेळा वगळता सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर वेळीच सावध होत राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच, मुंबईकरांच्या लोकल सेवेवर देखील टांगती तलवार उभी राहिली आहे.

मात्र, आता गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीटात पाच पट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR मधील प्रमुख स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म दंड वाढण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर १० रुपयांऐवजी ५० रुपये इतके प्लॅटफॉर्म तिकीट आकारले जाईल.

रेल्वेच्या या निर्णयावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. ‘मुंबईमध्ये केंद्र सरकारद्वारे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवून ५० रुपये इतके करण्यात आलं आहे. तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील,’ अशी बोचरी टीका भाई जगताप यांनी केली आहे.

नवे दर १५ जूनपर्यंत !

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले असून हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!