मुंबई : राज्यातील कोरोना स्थिती काही दिवसांपूर्वी आटोक्यात आल्या नंतर गर्दीच्या वेळा वगळता सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर वेळीच सावध होत राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशातच, मुंबईकरांच्या लोकल सेवेवर देखील टांगती तलवार उभी राहिली आहे.
मात्र, आता गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीटात पाच पट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR मधील प्रमुख स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म दंड वाढण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर १० रुपयांऐवजी ५० रुपये इतके प्लॅटफॉर्म तिकीट आकारले जाईल.
रेल्वेच्या या निर्णयावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. ‘मुंबईमध्ये केंद्र सरकारद्वारे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवून ५० रुपये इतके करण्यात आलं आहे. तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील,’ अशी बोचरी टीका भाई जगताप यांनी केली आहे.
मुंबई में केंद्र सरकार द्वारा प्लेटफार्म टिकट का दाम बढ़ाकर 50 rs कर दिया गया!
वो दिन दूर नही, जब बाहर से स्टेशन देखने का भी पैसा लेंगे मोदीजी ????#mehengaikavikas
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) March 3, 2021
नवे दर १५ जूनपर्यंत !
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले असून हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहेत.’
महत्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
- खास फीचर्सने ग्राहकांना आकार्षित करणाऱ्या रेनो किगरची डिलीव्हरी सुरु
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

