औरंगाबाद : २२ जून पासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी मंदावलेल्या लसीकरणाला आता गती मिळताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसात सुमारे सात हजार जणांचे लसीकरण महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. दररोज सरासरी १४ ते १५ हजार जणांना दिली जात आहे. त्यामुळे आता शहरातील लसीकरणाचा चार लाखांचा टप्पा पूर्ण झाला असून येत्या काळात ही संख्या अजून वाढणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे २१ जूनपासून लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र राज्य सरकारने लसींची उपलब्धता विचारात घेऊन ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले होते. त्यानंतर लसींची संख्या वाढल्याने राज्य शासनाने नव्याने आदेश काढत २२ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु केले आहे. यात पहिल्याच दिवशी (दि.२३) १२ हजार २३० जणांचे लसीकरण झाले तर दुसऱ्या दिवशी १४ हजार ६७ जणांनी लस घेतली. लसीकरण केंद्रांवर पहाटे पासूनच रांगा लागत आहेत.
गेल्या पाच दिवसात ६० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सुरुवातीला लसींची उपलब्धता नसल्याने लसीकरणाची संख्या कमी होती. त्यानंतर मात्र दुसरी लाट ओसरली आणि नागरिकांची लसीकरण करून घेण्याची इच्छा देखील नाहिशी झाली. मनपाकडे ५० हजार लसी उपलब्ध असतानाही लसीकरणाची गती मंदावली होती. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्याने औरंगाबादेत लसीकरणाची गती वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इलेक्ट्रॉनिक दुचाकी मोदी सरकारच्या निर्णयामुळे स्वस्त
- …अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल; फडणवीसांची घोषणा
- कॉंग्रेसने स्वबळाची भाषा केल्यानंतर राष्ट्रवादीनेही सुरु केली जोरदार मोर्चेबांधणी
- ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो…’ ; सलमानने दिलेला शब्द पाळला
- कश्यप परुळेकर दिसणार नेताजी पालकरांच्या भूमिकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

