Share

‘राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह,वीज तोडणी थांबवा आणि गरीब,मध्यम वर्गाला मदत करा’

Published On: 

मुंबई – राज्यातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं राज्य शासनानं काल जाहीर केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली; त्यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

या नव्या निर्बंधानुसार राज्यात आजपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असेल; तर दिवसा जमावबंदी लागू असेल. सर्व मॉल्स, रेस्टॉरंटस बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यपदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालयं ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील.

दरम्यान, खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर दर सप्ताहांती म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संपूर्ण टाळेबंदी असेल असं शासनातर्फे सांगण्यात आलं. हे सर्व निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.

दरम्यान,राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह आहे. ती रोखण्यासाठी जनतेनं राज्य सरकारला सहकार्य करावं. या संदर्भात आमचाही राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा राहील, असं विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं नव्या मानक कार्य प्रणालीबाबत लवकरंच जनतेचं प्रबोधन करावं, तसंच वीज तोडणी थांबवावी आणि गरीब आणि मध्यम वर्ग तग धरू शकतील एवढी तरी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!