मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे.
या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ‘राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसून शनिवारी, रविवारी (१०-११ एप्रिल) म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात येईल. तर ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येतील. राज्यात उद्यापासून रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, मॉल, रेस्टॉरंट, बार हे बंद राहतील. मात्र, होम डिलीव्हरी सुरु असेल.
तर, , निम्म्या क्षमतेने सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहेत. याबाबत लवकरच सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली असून निर्बंधांबाबत आजच नियमावली जाहीर करण्यात येईल व उद्या रात्री आठ वाजल्या पासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.
सध्या नागरिकांना महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? लागणार तर कधी? असे प्रश्न भेडसावत आहेत यामुळे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आव्हान केले आहे. ‘गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले. आम्हाला यावेळी तसं होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देऊ,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्र्यांनी प्रशासनाची बैठक घेवून देखील मृत्यूदर थांबत नाहीत : संजय केनेकर
- कंपाउंडरच्या यशानंतर आता जयंत पाटलांचा चेहरे पाहून कोरोना सांगण्याचा नवा फॉर्म्युला- भाजप
- मोठी बातमी : लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागल्यास सहकार्य करा; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन
- निःशब्द भावनांना बच्चू कडू यांची साथ, राख झालेल्या संसाराला दिला मदतीचा हात
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’


