टीम महाराष्ट्र देशा – बिस्लेरीच्या बाटलीवर आता मराठीतही लेबल लावायला सुरुवात झालीये.पण यावरून आता काँग्रेस मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.बिस्लेरीवर मराठीत लेबलं आली याचं श्रेय आता मनसेनं घेऊ नये असं वक्तव्य कांग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलं आहे.
याचा निर्णय ऑगस्टमध्येच झाला होता, अशी टीकाही केलीय. आहे. हा मनसेच्या मराठीचा आग्रह धरणाऱ्या आंदोलनाचा परिणाम नाहीये. आंध्र आणि तेलंगणामध्येही या आधीच स्थानिक भाषेत लेबल लावण्यात येत आहेतय असं काँग्रेसचं म्हणणं आहे. पण मनसेला हे म्हणणं मान्य नाही. मनसेने आता मराठी पाट्यांचे आंदोलनही हाती घेतले आहे.तसंच मध्यंतरी फेरीवाल्यांचे आंदोलनातही मनसे सक्रिय झाली होती.



