Share

‘ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा एकही सिनेमा या मातृभूमीत चालू देणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी काल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपच्या अनेक नेत्यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी यावेळी तालिबानवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंगदल या संघटनांवर देखील टीका केली आहे. याच मुद्दयावरुन भाजपचे नेते त्यांच्यावर चांगलीच पेटून उठले आहेत. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी देखील अख्तर यांच्यावर टीका केली आहे.

‘जावेद अख्तर यांचे हे वक्तव्य लाजीरवाणे आहे. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिदू परिषदेचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारे आहे. हे अपमानजनक आहे, असं राम कदम म्हणाले आहेत. ‘जोपर्यंत जावेद अख्तर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्याचे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे चित्रपट या मातृभूमीमध्ये चालू देणार नाही’, असा इशारा देखील राम कदम यांनी जावेद अख्तर यांना दिला आहे.

संघाबाबत वक्तव्य करताना थोडा विचार करायला हवा होता की, याच संघातील लोक आज राजगादी संभाळत आहेत. राजधर्म चालवत आहेत. तालिबानी विचारधारा असती तर त्यांनी हे केलंच नसतं, असं म्हणत जावेद अख्तर यांना माफी मागण्यास सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!