Share

रामदास आठवलेंचा नविन वर्षाचा राजकीय संकल्प! म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारला…”

Published On: 

🕒 1 min read

पुणे: कोरेगाव भीमा येथे शनिवारी २०४ वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनेक मान्यवरांनी येथे उपस्थिती लावली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), नितीन राऊत (Nitin Raut) व इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले म्हणाले, शौर्य दिन यांच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. १८१८ साली या ठिकाणी ५०० जणांनी बलिदान दिले होते. या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारले असता रामदास आठवले यांनी नवीन वर्षाचा काय संकल्प केला आहे ते देखील त्यांनी सांगितले आहे. आठवले म्हणाले, नविन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकारला घालवायचा आहे. रिपब्लिकन पक्ष अत्यंत मजबूत करायचा आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचा, असा संकल्प सांगत महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!