🕒 1 min read
पुणे : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी ३० डिसेंबर रोजी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या बैलगाडा शर्यतीचे काय?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
या पार्श्वभूमीवर आज (१ जाने.) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याविषयी भाष्य केले आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना पवार म्हणाले की, “हे जगावर आलेले मोठे संकट आहे. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही. राज्याचे प्रमुख या नात्याने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शर्यती किंवा इतर कार्यक्रमांना आपण मुरड घालायला हवी”, असे पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की स्पर्धा भरवा, पण त्याची परवानगी तिथल्या स्थानिक प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायला हवी. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देताना राज्य सरकारच्या पातळीवर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. त्यांनी ती अंमलबजावणी करावी’, असे पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
