Share

कोरोना बाधितांनी घरीच उपचार घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची आणि बळींची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. देशात जवळपास सर्वच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. मात्र, अशातच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रुग्णांना घरीच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

या संदर्भात न्यूज एजन्सीने डॉ. हर्षवर्धन यांनी असे आवाहन केले असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ९८ ते ९९ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरजच नसल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. अधिकाधिक रुग्ण हे घरीच बरे होवू शकतात आणि होत आहेत. गरज पडली तरच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यामध्ये दिला आहे.

देशात सध्या कोरोना बळींची संख्या झपाट्याने वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे हे वक्तव्य धक्कादायक म्हणावे लागेल. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच खासगी हॉस्पिटल तर रुग्णांकडून मनमानी पैसे वसूल करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे हे वक्तव्य निश्चितच विचार करायला लावणारे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!