Share

मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार

Published On: 

दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला फटकारले असून विरोधकांनी देखील हल्लाबोल केला आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्यात येत असल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांसमोर पुन्हा एकदा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे टाळेबंदीमध्ये गरिबांसाठी करण्यात आलेल्या धान्याच्या मदतीनंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

याबाबत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २६ हजार कोटी रुपयांच्या धान्याचे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. यामुळे देशातील ८० करोड जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.’ असं अमित शाह म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!