नागपूर:- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेस नेते आशिष देशमुख या राजकीय क्षेत्रातील काका-पुतण्यामधली ‘तू तू मै मै’ पुन्हा एकदा उघड्यावर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख काका काटोल मतदारसंघातून गायब झाले आहेत, असं म्हणत पुतणे आशिष देशमुख यांनी घरचा आहेर दिला आहे. ते ‘tv9 मराठी’शी बोलत होते.
अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, असं आशिष देशमुख म्हणाले आहेत.
आगामी काळात काँग्रेस सत्तेत येणार, असा विश्वासही आशिष देशमुखांनी बोलून दाखवला आहे. अनिल देशमुख औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात, असा टोलाही त्यांनी काकांना लगावला आहे.
आशिष देशमुख हे 2014 ला नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती धरला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या
- जो महाराष्ट्र वर्षभरात १ लाख ९० हजार कोटी जीएसटी देतो त्या महाराष्ट्राला काय मिळाले?
- ‘तिजोरीत खडखडाट असतानाही शेतकऱ्याला आमच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली’
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा अर्थसंकल्प – हुसेन दलवाई


