🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सध्या कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. सगळा निधी माझ्या हातात आहे. जर माझ्या विचाराचा कुणीही सरपंच झाला नाही तर एक रुपयाचाही निधी मी त्या गावाला देणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी जाहीर सभेत दिला आहे.
त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “राणेंना सत्तेचा माज असल्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत. नारायण राणेंचा माज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने उतरला होता, तसाच सत्तेचा माज नितेश राणेंचा देखील जनता उतरवेल. त्यामुळे मतदारांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देऊ नये”, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नितेश राणेंवर टीका केली.
पुढे ते म्हणाले, “खरंतर विकास ही प्रक्रिया असते. ही सत्ता कोर्टाच्या आदेशानुसार कधीही पडू शकते. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. शिंदे फडणवीस यांचं सरकार येऊन सहा महिने झाले तरी नितेश राणे यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यांना ते मिळणार नाही. इथल्या जनतेला नम्र आवाहन आहे की, ज्याप्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून विकास झाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही होईल.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तापसे (Mahesh Tapase) यांनी नितेश राणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत निवडणूक आयोगानेच त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्या गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane | “माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर…”; नितेश राणेंची मतदारांना जाहीर धमकी
- Jayant Patil | राज्यपालांना ‘ते’ पत्र पाठवण्यासाठी इतके दिवस का लागले? – जयंत पाटील
- Pankaja Munde | गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंचं भाषण; म्हणाल्या, “महापुरुषांबद्दल वाईट बोलणाऱ्यांचं…”
- Ajit Pawar | खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्र्र ओळख आहे – अजित पवार
- Health Tips | हिवाळ्यामध्ये 10 मिनिटे उन्हात बसल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

