मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर अनपेक्षितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले . विरोधकांचा हल्लाबोल, आघाडी सरकारमधील अंतर्गत कलह, कोरोना महामारी, नैसर्गिक संकट, मंत्र्यांवरील आरोप अशा अडथळ्यांना मात देऊन उद्धव ठाकरे हे आता मुख्यमंत्रीपदाचे २ वर्षे पूर्ण करणार आहेत. हे सरकार ५ वर्षे टिकेल असा विश्वास महाविकास आघाडीतील नेते व्यक्त करत असून भाजप नेते मात्र हे सरकार कोसळेल असं भाकीत करत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर भाजप नेते सातत्याने हल्लाबोल करत असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा कौतुकाची थाप दिली आहे. संजय राऊत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी, ‘नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात का?’ असा सवाल केला.
यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो.’ दरम्यान, शिवसेनेनं गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरु केल्याचं राऊत यांनी जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- ‘आयपीएल आणि पैशांसाठी सामना रद्द करण्यात आला’; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप
- टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, नाहीतर सक्तीची स्वेच्छानिवृत्ती- नितीन गडकरी
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ‘भारतीय असल्यानं प्रत्येक सण साजरे करणार’; अर्शी खानचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

