Share

‘आयपीएल आणि पैशांसाठी सामना रद्द करण्यात आला’; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप

Published On: 

नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना रद्द केला असल्याची माहिती मिळाली.

मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं. मात्र, हा सामना कोरोनामुळे नव्हे तर पुढची परिस्तिथी पाहता रद्द केला आहे. हा सामना आयपीएमुळे रद्द केल्याचा गंभीर आरोप इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने केला आहे.

या सर्व प्रकारावर मायकल वॉन याने ‘द टेलिग्राफ’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे सर्व आयपीएल आणि पैशांसाठी करण्यात आले. खेळाडूंना कोरोना संक्रमित होण्याची आणि त्यामुळे आयपीएलला मुकण्याची भीती वाटत होती, त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करम्यात आला. एका आठवड्यात आयपीएल सुरू होईल आणि खेळाडू आनंदात इकडून-तिकडे पळताना दिसतील. परंतु भारतीय खेळाडूंनी आरटीपीसीआर चाचणीवर विश्वास दाखवायला हवा होता. या विषाणूबाबत आता आपण सर्व काही जाणून असून याचा योग्य पद्धतीने सामना केला जावू शकतो.’

मला याचे आश्चर्य वाटते की मँचेस्टर कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ आपल्या 20 सदस्य संघातून 11 खेळाडू मैदानात उतरवू शकला नाही. काही खेळाडूंना हा सामना खेळायचा नसेल तर ठीक आहे. परंतु भारताने आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. असही वॉनन म्हंटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

‘आयपीएल आणि पैशांसाठी सामना रद्द करण्यात आला’; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप

Published On: 

नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना रद्द केला असल्याची माहिती मिळाली.

मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं. मात्र, हा सामना कोरोनामुळे नव्हे तर पुढची परिस्तिथी पाहता रद्द केला आहे. हा सामना आयपीएमुळे रद्द केल्याचा गंभीर आरोप इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने केला आहे.

या सर्व प्रकारावर मायकल वॉन याने ‘द टेलिग्राफ’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे सर्व आयपीएल आणि पैशांसाठी करण्यात आले. खेळाडूंना कोरोना संक्रमित होण्याची आणि त्यामुळे आयपीएलला मुकण्याची भीती वाटत होती, त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करम्यात आला. एका आठवड्यात आयपीएल सुरू होईल आणि खेळाडू आनंदात इकडून-तिकडे पळताना दिसतील. परंतु भारतीय खेळाडूंनी आरटीपीसीआर चाचणीवर विश्वास दाखवायला हवा होता. या विषाणूबाबत आता आपण सर्व काही जाणून असून याचा योग्य पद्धतीने सामना केला जावू शकतो.’

मला याचे आश्चर्य वाटते की मँचेस्टर कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ आपल्या 20 सदस्य संघातून 11 खेळाडू मैदानात उतरवू शकला नाही. काही खेळाडूंना हा सामना खेळायचा नसेल तर ठीक आहे. परंतु भारताने आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. असही वॉनन म्हंटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!