Share

खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर

Published On: 

बुलढाणा : केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून वाढलेल्या तेलाच्या किंमती काहीशा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ४ ते ५ रुपयांनी खाद्यतेल कमी होणार असलं तरी यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार असल्याचं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नमूद केलं आहे.

रविकांत तुपकर म्हणतात, ‘केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हादरा दिला आहे. पामतेलावरील आयात शुल्क १० वरून थेट २.५%,तर सोयाबीन,सूर्यफूलाचे शुल्क ७.५ वरून २.५ टक्क्यांवर आणले आहे.त्यामुळे सूर्यफूल व सोयाबीन तेल प्रति किलो चार रुपयांपर्यंत स्वस्त होतील.’

मात्र ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे सोयाबीनच्या भाव मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. केंद्र सरकार सातत्याने शेतकरीविरोधी निर्णय घेत आहे. केंद्राचे कृषीविषयक धोरण देशातील शेतकऱ्यांना पूरक नसून मारक आहे. त्यात तातडीने बदल करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!