मुंबई : काही दिवसांपूर्वीच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, ईडीकडून राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका कार्यक्रमात या संदर्भात विचारण्यात आले असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘तुम्ही महाराष्ट्राचा देशासाठी आधार म्हणून उपयोग का करत नाही?’, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने सध्या राजकारण सुरु आहे. धाडीमागून धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात, दिवस बदलतात’, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांत या केंद्रीय तपास यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. तिथे बंदरावर किती मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले होते. आपल्याकडे चिमूटभर सापडले तर केवढा गहजब केला जातो.’ तसेच महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू असून महाराष्ट्रात गांजाची शेती फुललेली आहे, घराघरात टेरेसमध्ये गांजाच गांजा आहे म्हणून महाराष्ट्राला बदनाम करायचे हे षडयंत्र आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
भारताने एकतर्फी सामना जिंकला ; कर्णधार रोहित मात्र खेळांडूवर भडकला
‘भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडे पडण्याची भीती असल्यानेच…’ विखे पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
रिद्धिमान साहा होऊ शकतो सस्पेंड; बीसीसीआय संघ निवडी विषयी आरोपांवर प्रश्न विचारणार
टेनिसला मिळणार नवा बादशाह..! युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाच्या मेदवेदेवचा भीमपराक्रम
‘भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सज्ज’ – नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

