🕒 1 min read
मुंबई: लखनऊ येथे झालेला भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना भारताने ६२ धावांनी जिंकला. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी श्रीलंका संघाचे वर्चस्व एकवेळही जाणवू दिले नाही. भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने सामना विजय जवळपास निश्चित केला होता. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सुरेख सुरुवात करून दिली. मोठ्या अंतराने सामना जिंकूनही रोहित मात्र काही खेळाडूंवर नाराज दिसला.
झाल अस की , वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने भुवनेश्वर कुमारच्या षटकात अतिशय सोपा झेल सोडला होता. त्यामुळे रोहित चांगलाच संतापलेला दिसला. सामन्यानंतर तो म्हणाला, “आम्ही सातत्याने खूप सोपे कॅच सोडत आहोत. आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाला अजून खूप काम करायचे आहे. मिशन ऑस्ट्रेलियापूर्वी आम्हाला एक चांगला क्षेत्ररक्षण करणारा संघही तयार करायचा आहे आणि असे कॅच सोडणे जास्त सहन केले जाणार नाही.”
कर्णधार रोहित शर्माने ३२ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याच्या सोबत भागीदारीतईशान किशनने अवघ्या ५६ चेंडूत ८९ धावा केल्या. यानंतर श्रेयस अय्यरनेही तुफानी खेळी करत २८ चेंडूत ५७ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने श्रीलंकेसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २० ओव्हरमध्ये ६ गडी गमावून केवळ १३७ धावा करू शकला. श्रीलंकेकडून चारिथ अस्लंका हा एकमेव खेळाडू होता जो अर्धशतक झळकावू शकला.
महत्वाच्या बातम्या
- रिद्धिमान साहा होऊ शकतो सस्पेंड; बीसीसीआय संघ निवडी विषयी आरोपांवर प्रश्न विचारणार
- टेनिसला मिळणार नवा बादशाह..! युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाच्या मेदवेदेवचा भीमपराक्रम
- ‘भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सज्ज’ – नितीन गडकरी
- पालकमंत्री बच्चू कडू जनता दरबारी; एकाच दिवशी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
- मुसलमान म्हणजे दहशतवाद्यांशी संबंध आहेच असं होत नाही- सना मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
