कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारवर गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं असून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत वर्तवलं जात आहे. या सरकारची आता वर्षपूर्ती होत असतानाच शिक्षक व पदवीधर आमदार निवडणुकांमुळे आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं दिसून येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चांगला चालवू शकतात. ते कधी आमदार झाले नाहीत. कधी खासदार झाले नाहीत. कधी नगरसेवकही झाले नाहीत आणि स्थायी समितीचे अध्यक्षही झाले नाहीत.’
‘प्रशासन चालवताना हजार प्रश्न घेऊन बसावं लागतं किंवा संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक असणं ही वेगळी बाब आहे, असं सांगतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम कंट्रोल ठेवला. त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला. तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असं होतं. त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आलं आहे,’ अशी जळजळीत टीका पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत पुन्हा एकदा घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत; विषयावरून वाढली उत्सुकता
- सदाभाऊंनी आमदारकीसाठी ‘ही’ १२ नावं घेऊन राज्यपालांची घेतली भेट; आमटे, झहीर खानसह दिग्गजांची नावं
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘सरनाईक कोरोनाला घाबरतायत की ईडीला?’
- भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या गायकवाड यांचे पक्षात स्वागत- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

