कोकण : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण गढूळ होत चाललं आहे. दादरमध्ये शिवसेना पक्ष आणि शिंदे गटामध्ये राडा झाला आहे. तर अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. उदय सामंत यांना रिफायनरी विरोधकांनी धमकी दिली आहे.
उदय सामंत यांना कोणी दिली धमकी?
रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकणात होणाऱ्या रिफायनरीला विरोध करताना नरेंद्र जोशी बोलतं होते.
ते म्हणाले की, रिफायनरीला विरोध केला म्हणून आम्ही मुंबईला असताना गावी आमच्या माता भगिनींवर अनेक गुन्हे दाखल केले जातात. कोणत्या आधारावर गुन्हे दाखल करता? थोडंतरी लॉजिक लावा. कोणता तरी मंत्री सांगतोय म्हणून गुन्हे दाखल केले जातात. त्या उदय सामंतला तर आम्ही जाळून टाकू.
पुढे नरेंद्र जोशी असंही म्हणाले की, आमचं गाव, आमची जागा, आमचं भविष्य आम्ही उद्धवस्त होऊ देणार नाही. आम्हाला आमची पवित्र पंचकृषी पाहिजे, आमच्या पंचकृषीत कुणी पाय ठेवला तर त्याचा पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या आंदोलनाची पहिली गोळी हा नरेंद्र जोशी स्वत:च्या अंगावर घेईल, पण हा प्रकल्प होऊ देणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Anil Parab | अखेर पर्यावरण विभागाकडून आदेश! अनिल परबांचं रेसाॅर्ट होणार जमीनदोस्त
- Randas Athawale | “मनसेला सोबत घेऊ नका…”; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या युतीवर रामदास आठवलेंचं वक्तव्य
- Devendra Fadnavis | शिवसेनेतील बंडावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य! म्हणाले, एक व्यक्ती जबाबदार
- Shinde-Fadanvis | वर्षावर हालचाल! शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तब्बल पावणे दोन तास चर्चा
- Shahajibappu Patil | “आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे”


