🕒 1 min read
मुंबई: अँटिग्वा येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय अंडर १९ संघाने ऑस्ट्रेलियाला ९६ धावांनी पराभूत करत सलग चौथ्यांदा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. भारताला विजय निश्चित करताना कर्णधार यश धुलने शतकीय खेळी केली. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा तिसरा भारतीय कर्णधार तो ठरला.
नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. ज्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया पुढे २९० धावांचे लक्ष ठेवले. दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १९४ धावांवरच सर्वबाद झाला. भारताच्या विकी ओस्तवाल या गोलंदाजाने तीन विकेट्स घेतल्या. उपकर्णधार शेख रशीदने हि ९४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली आहे. तर कर्णधार यश धुलने धुव्वादार फटकेबाजी करत ११० धाव केल्या. यशच्या आधी विराट कोहली (२००८) आणि उन्मुक्त चंद (२०१२) यांनी शतक केले होते.
India become the first team in #U19CWC history to qualify for four consecutive finals ???? pic.twitter.com/bHkhaes9WI
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 2, 2022
भारतीय संघासाठी हा अंडर १९ वर्ल्डकपचा मार्ग सुरुवातीपासून समस्यांनी भरलेला होता. स्पर्धेच्या सुरुवातीलाच कर्णधार यश धूलला कोरोनाची लागण झाली होती. तिथून भारतीय संघाने परिस्थिती सांभाळत आणि चांगली कामगिरी करत फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताने याआधी आठवेळा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे यंदाही भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारताचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध ५ फेब्रुवारी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेते अमित देशमुख कोरोना पॉझिटीव्ह
- “एकाच्या खिशात भरभरून कोंबायचे आणि…”, केंद्रीय अर्थसंकल्पाहून संजय राऊतांची टीका
- परमबीर सिंहांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह…”
- “…तर मानसिक संतुलन बिघडतं”, नवाब मलिकांच्या टीकेवर मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर
- ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
