नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला 20 षटकांचा सिडनी येथे झालेला सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेतला हा दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले 195 धावांचे आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. शिखर धवन 52, विराट कोहली 40 आणि हार्दिक पंड्याच्या नाबाद 42 धावांनी भारताचा विजय साकार केला.
Hardik Pandya was named MOM, top innings but T. Natarajan 2/20 when a team makes 194 was the match winning performance in my view. #AUSvIND
— Tom Moody (@TomMoodyCricket) December 6, 2020
दरम्यान, भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावांची तुफानी खेळी करत भारताचा विजय निश्चित केला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांनी मांडलेल्या एका मताची सध्या चर्चा सुरु आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत मूडी म्हणाले, ”हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने उत्कृष्ट खेळी खेळली. मात्र प्रतिस्पर्धी संघ १९४ धावा काढत असताना नटराजनने फक्त २० धावा देत पटकाविलेले २ बळी, ही माझ्या मते खऱ्या अर्थाने सामना जिंकवून देणारी कामगिरी होती.”दरम्यान,या मालिकेतला अखेरचा सामना 9 डिसेंबरला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरएसएस नावाचाच आग्रह का? सर्वोच्च न्यायालायाचा याचिकाकर्त्याला सवाल…
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने केला ‘हा’ आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

