नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर आता अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान,कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आज आणखी वाढून 94.37 टक्के झाला आहे. आज सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या ही दररोज आढळणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा जास्त आहे. देशातले सुमारे 91 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या 22 पट आहे.
गेल्या महिनाभरापासून दैनंदिन रुग्ण वाढही 50 हजारांच्या खाली नोंदवली जात आहे. काल दिवसभरात सुमारे 36 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली तर 42 हजार रुग्ण या आजारातून बरे झाले. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत असून सध्या ते प्रमाण 4.2 टक्के आहे.
सध्या देशभरात 4,03,248 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या एकंदर बाधितांच्या केवळ 4.18 टक्के आहे. देशाचा कोविड मृत्यू दर सध्या 1.45 टक्के असून काल दिवसभरात या आजारामुळे देशात 482 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी करोना लस विकसित करण्यात येत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. करोनावरील लस ही जादूची कांडी नसून करोनाचा संसर्ग पूर्णपणे संपणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. मात्र या लसीकरण दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा देखील महत्वपूर्ण आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

