नवी दिल्ली : कोरोनाच्या परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना समजलाच नाही असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोना हा केवळ आजार नसून तो बदलणारा आजार आहे. या आजारावर मास्क आणि लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय आहे. या आजाराला रोखण्यासाठी तीन ते चार प्रकार असल्याचं राहुल यांनी सांगितले आहे.
राहुल जी आपकी PC Toolkit के script अनुसार हुई है। लोग यह सब समझते है।
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) May 28, 2021
दरम्यान, राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचं आणि टीकेचं खंडन केलं आहे. जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत करोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला नौटंकी वगैरे शब्द वापरुन देशाच्या जनतेचा अपमान केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ते म्हणतात, आम्हाला नौटंकीसारखे शब्द वापरायचे नाहीत. पण त्यांची नौटंकी जनतेनं कधीच बंद केली आहे असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?’
- सकारात्मक! लातुरात कोरोना रुग्ण संख्या होतीये कमी
- मुंबई महापालिकेची निवडणूक होणार ? निवडणूक आयोगासोबत अधिकाऱ्यांची बैठक


