मुंबई : आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर या मुद्द्यावरून भाजपकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली जात आहे. तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण याना भाजपने लक्ष केले आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अशोक चव्हाण आक्रमक झाले आहेत. त्यानंतर आता चव्हाण यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
‘मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देत आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे,’ अशी बोचरी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली आहे.
#मराठाआरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देते आहे.
दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे.
हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही.
बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?— Ashok Chavan (@AshokChavan1958) May 28, 2021
‘हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?’ असं आव्हानही अशोक चव्हाण यांनी भाजपला दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार; राजेश टोपेंचे सूतोवाच !
- तुळजापुरात नियमांचे उल्लंघन; ३२ दुकानांना बजावल्या नोटीस
- ‘नुकसानीचे प्रमाण पाहता राज्य सरकारने जाहीर केलेली मदत कोकणवासियांची क्रूर थट्टा करणारी आहे’
- ‘देशाला वाचवायचे असेल तर नोटा छापण्याची हीच ती वेळ !’
- ‘कोरोना काळात अपयशी ठरलेल्या मोदींना माफी मागण्यासाठी सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

