Share

लॉकडाऊन अटळ ? आज तब्बल ४० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

तर, अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती आटोक्याबाहेर गेल्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? याबाबत सामान्यांच्यामध्ये काहीशी भीती निर्माण झाली आहे. तर, दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची तयारी करा, असे निर्देशच प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, आज राज्यात तब्बल राज्यात आज ४० हजार ४१४ कोरोनाबाधित  रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन १७ हजार ८७४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आता पर्यंत एकूण एकूण 23 लाख 32 हजार 453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 3 लाख 25 हजार 901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यासोबतच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत असून आता 85.95% इतके झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!