मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज राज्यात ५ हजार ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार २६२ इतकी आहे. कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९६.८४ टक्के इतकं नोंदवलं गेलं आहे. मृत्यूचा दर २.११ टक्के इतका आहे.
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०७,५९,७६७ नमुन्यांपैकी ६३,८७,८६३ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १२.५८ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात ३,७३,८१२ रुग्ण होम क्वारंटाइन, तर २५१२ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला आहे.
दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे शहरात आज नव्याने २५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर…
- अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; वाचा कोणती फेरी कधी ?
- मान्सून पुन्हा सक्रिय ; राज्यातील ‘या’ भागात कोसळणार, येलो अलर्ट जारी
- ‘तुम्हाला दिल्लीतल्या दाढीवाल्याने आरोप करायला सांगितले का?’, नाना पटोलेंचा गडकरींना खोचक सवाल
- ‘राज्यावर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार ; नियोजन करा’-अजित पवार
- ‘पुलवामासारखे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी भारतीयांची लस फुकट दिली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

