🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबत राज्याच्या राजकारणात मोठा वाद सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमध्ये हा वाद सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर पक्षातील इतर नेत्यांना पुढं करायचं होतं. असं सांगत हा वाद सुरु झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर तुफान टोलेबाजी केली आहे. शरद पवारांनीही त्याच मद्द्याला धरुन फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे सांगितलं.
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनायला तयार नव्हते. मी त्यांचा हात वर केला. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजावाला संधी द्यावी यासाठी मी त्यांचा हात वर केला आणि म्हणालो हेच मुख्यमंत्री होतील. हातातली सत्ता गेली म्हणून फडणवीस असे आरोप करतात. सत्ता गेल्याचं दुख त्यांना आवरेनासं झालंय, असं शरद पवार म्हणाले. त्यावर आता फडणवीसांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी थेट द्वापारयुगातील कथेचं उदाहरण देत मुख्यमंत्री आणि शरद पवारांवर टीका केली आहे.
द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!, असं फडणवीस म्हणाले आहेत.
द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?
साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- दानवेंनी बालिशपणा करण्यापेक्षा सिस्टीम समजून घ्यावी; तनपुरेंचा दानवेंना सल्ला
- विखे सध्या निवांत झोप येणाऱ्या पक्षामध्ये गेलेत; तनपुरेंचा सुजय विखे पाटलांना टोला
- तालुक्यात विकासकामं केल्यावर मला शांत झोप लागते; दत्तामामांचा हर्षवर्धन पाटलांना सणसणीत टोला
- बाबांनो…तरीही पवारसाहेबांना पण विचारावं लागणार आहे; अजित पवारांचा यु टर्न
- उद्धव ठाकरेंचा दसऱ्यादिवशीच शिमगा, शेतकऱ्यांविषयी एकही शब्द काढला नाही- चंद्रकांत पाटील
- ‘उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यात गुंतवणूक असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
